Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना केंद्राचा दिलासा; 'या' दराने खरेदी करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : कांद्याचे पडलेल्या दरावरून राज्यातील राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे केंद्र सरकार शेतमालाचे दर कमी करण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. दरम्यान, जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रश्नी लक्ष घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Political News)

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली आहे. फडणवीसांनी सांगितले, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पीयुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे."

यासह राज्यात दोन ठिकाणी खऱेदी केंद्र सुरू करण्याबाबतही फडणवीसांनी माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हा कांदा दोन हजार ४१० प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल," असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT