Aditya Thackeray
Aditya Thackeray sarkarnama
मुंबई

विरोधकांकडून घरे पेटविण्याचे काम... आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः महाविकास आघाडी सरकार हे शाश्वत विकासावर भर देऊन काम करत असून बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधी पक्षातील मंडळी भांडण कशी लागतील, देश व समाज कसा विखुरला जाईल, यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही चुल पेटवण्यासाठी काम करतोय तर काही लोक घर पेटवण्यासाठी काम करत आहे, अशी टीका राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर केली आहे.

मुळात सगळ्यांनी आनंदाने एकत्र राहायचे की भांडण लावायची याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे, असा आरोप करून आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून बेस्टमध्ये आम्ही विविध बदल घडवून विविध उपक्रम राबवतो. जसे मोबिलिटी कार्ड, टॅप इन टॅप आऊट, नवीन बसस्टॉप, नवीन बसेस असतील, असे अनेक बदल करत आहोत.

पण हे सगळे करताना बेस्टचे कर्मचारी व चालक असतील त्यांच्यासाठी चांगला पौष्टिक आहार मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत. यामध्ये अक्षय चैतन्यच्या मदतीने मुंबईतील शाळा, बेस्ट डेपो इथे आपण पौष्टिक आहार मिळावा म्हणून सुरूवात केली आहे. १३ डेपोमध्ये कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. आज आम्ही लोकांची चुल पेटवण्यासाठी काम करतोय. तर काही लोक घर पेटवण्यासाठी काम करताय त्यांच्यावर काय बोलायचं, अशी टीका त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केली.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार ही शाश्वत विकास काम बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर विरोधी पक्ष भांडण कशी लागतील, देश कसा विखुरला जाईल, समाज कसा विखुरला जाईल, यासाठी प्रयत्न करतंय. त्यांच्या बाबतीत मी काही बोलत नाही. पण, सगळ्यांनी एकत्र आनंदाने रहावे. भांडण किती लावायची याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT