Raj Thackeray hits back at Union Minister Jitendra Singh in Mumbai, issuing a strong statement against Modi’s minister Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray On Jitendra Singh : मुंबईत येऊन ललकारणाऱ्या मोदींच्या मंत्र्याला राज ठाकरेंनी ठणकावले, 'मळमळ पुन्हा एकदा...'

Raj Thackeray Slams Jitendra Singh in Mumbai: मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईत येऊन मुंबई-बाॅम्बे शब्दाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार राज ठाकरे यांनी घेतली आहे.

Roshan More

Jitendra Singh vs MNS Controversy: मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजराताशी जोडण्यासाठी मोदी-शहा धडपड करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यातच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील एका कार्यक्रमता म्हणाले, आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले, त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश आहे.

सिंह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिंग यांचा समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, 'जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे.'

'खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा.', असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

...म्हणून मुंबई नाव खुपतंय

'यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. ', असे देखील राज ठाकरे म्हणाले.

मराठी माणसा जागा हो...

केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं, असे देखील ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT