Raj Thackeray News : मुंबई महापालिका निवडणुकीला मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा रंग चढत असताना मराठी माणसाचा मुंबईतील टक्का कमी असल्याची चर्चा होत आहे. मुंबईत मराठी लोकसंख्या 27 टक्के आहे. इतर भाषिक लोकसंख्या जास्त असल्याचा दावा देखील काही जणांकडून करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी या सगळ्याला उत्तर दिले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले, 'आम्ही सर्व्हे केला आहे. मराठी 40 ते 41 टक्के आहेत. गुजराती मारवाडी हे 13 टक्के आहेत. त्यामुळे मराठी माणसांची संख्या कमी आहे असे सांगतात ते खोटं आहे.'
युपी-बिहार उत्तर भारतीय साधारण १५ टक्के 15 टक्के आहे. वाटेल ते आकडे मराठी माणसाला डेमोरलाइज केले जात आहे, असे देखील ते म्हणाले.
या निवडणुकीत मराठी माणसाला निश्चित समजलं आहे की कोणाच्या बाजुने उभं राहायचं आहे. ते निश्चितपणे आमच्या बाजुने उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, पद्धतशीरपणे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. राज्यात सत्ताधीर आहेत. त्यांच्यावर कोणतरी आहे. त्यामुळे येथे बसले आहेत ते केवळ सही करण्यासाठी आहेत. त्यांना सही कर म्हटले की ते सही करणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.