Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : राजकारणातले ठाकरी वारे अन् आता 'राज'सोबत आलेला आहे..., 'सामना'च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

MNS Shivsena UBT Alliance : एकीकडे उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट बोलणं टाळलं आहे. "मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. शिवाय नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बघू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 16 Jul : मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भविष्यात देखील एकत्र राहणार का, ते दोघे युती करणार का? असे अनेक प्रश्न दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांना पडला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट बोलणं टाळलं आहे. "मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. शिवाय नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बघू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे ते अद्याप तरी युती संदर्भात बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसत आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज आता आपल्या सोबत आल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा टीझर लाँच केला आहे. या टीझरमध्ये खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंना, महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे काही हटत नाही थंड पडत नाही, असं विचारतात. त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात, "सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यासाठी नाही.

समाजाच्या हितासाठी आम्ही करत आहोत. आमच्या आजोबांपासून नंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे"; असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्याने ठाकरे बंधूच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव यांनी राज सोबत आल्याचं म्हटलं असलं तरी राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी, आतापर्यंत आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे गट युतीसाठी आतूर झाला असला तरी मनसेकडून सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT