MP Sanjay Raut, Sanjay Pawar Latest Marathi News
MP Sanjay Raut, Sanjay Pawar Latest Marathi News sarkarnama
मुंबई

शिवसेनेच्या दुसऱ्या संजयला माझ्यापेक्षा एक मत जास्त मिळेल! राऊतांना आत्मविश्वास

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणीलाही सुरूवात झाली आहे. खरी लढत शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय राऊत यांनी मात्र पवारांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. (Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi)

संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या किमान 41 मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. अपक्षांवरच त्यांची संपूर्ण मदार असणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर राऊतांनी पवार यांना आपल्यापेक्षा एक मत अधिक मिळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे पवारांचा विजय होणार असल्याचे संकेत आघाडीने दिले आहेत.

दरम्यान, सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून बाहेर पडले. विधान भवनातून निवासस्थानाकडे जाताना मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माध्यमांनी आज गुलाल उधळणार का, असा सवाल केला. त्यावर त्यांनी बराच वेळ उत्तर दिलं नाही. जाऊन परत येतो, असं ते सांगत होते. पण गाडीत बसताना त्यांनी 'अफकोर्स' असा एकच शब्द उच्चारत निकाल काय लागणार, याचे संकेत दिले.

दरम्यान, कॉंग्रेसच्या उमेदवारास ४४ पैकी ४२ मते देण्यात आल्याचे समजते. त्यांच्याकडील ४ मते, राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ९ आणि राष्ट्रवादी समर्थक अपक्षांची तीन मतेही शिवसेनेचे (Shivsena) दुसरे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना गेली आहेत. तर शिवसेनेचीही १३ मते त्यांना मिळाल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची पहिल्या पसंती क्रमांकाची २६ मते संजय पवार यांना मिळाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्याच बरोबर संजय पवार यांना आघाडीतील इतर घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांची ही मते मिळाल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या पसंतीची ४१ मते त्यांना मिळतील असा दावा, शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाला जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 2 आमदारांच्या मतांचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आव्हाडांप्रमाणे नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. या दोन्ही मुद्यांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावर सध्या फेर सुनावणी सुरु आहे.

सर्व आमदारांचे मतदान जवळपास पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीचे ४ ही उमेदवार विजयी होतील असा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले, कोणी काहीही दावा केला तरी मतांची संख्या उघड आहे. आघाडीकडे संख्याबळ आहे. एमआयएमचा हा निर्णय आहे त्यांनी कोणत्या स्तरावर हा निर्णय घेतला याची कल्पना नाही. काँग्रेसच्या 44 आमदारांचे मतदान झाले आहे. ही आघाडीची स्ट्रॅटेजी आहे. ठरल्याप्रमाणे काँग्रेसची अतिरिक्त मते आणि राष्ट्रवादी मित्रपक्षाची मते संजय पवार यांना दिली आहेत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT