Ram Mandir Inauguration Guest Sarkarnama
मुंबई

Ram Mandir Inauguration Guest : उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राऊत म्हणाले, 'ज्याचं योगदानच नाही, त्यांचा तो सोहळा...'

Chetan Zadpe

Mumbai News : नवीन वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा होणार आहे. भारतवर्षात हा सोहळा भव्यदिव्य आणि ऐतिहासिक करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. व्हीव्हीआयपींना निमंत्रणे पाठवली जात आहेत. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या खासदार सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या निमंत्रण यादीवरुन आता शिवसेना ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत तीव्र शब्दात अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, 'राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचं आमंत्रण ते उद्धव ठाकरेंना देणार नाहीत. ज्या कारणासाठी लालकृष्ण अडवानी यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही, त्याच कारणामुळे ठाकरेंनाही निमंत्रण ते देणार नाहीत. कारण आम्ही सगळे राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी होतो', असे राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"संपूर्ण शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, आम्ही सर्व या आंदोलनातील आरोपी आहोत. मी स्वत: त्यातला आरोपी आहे. ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला आहे त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उद्धव ठाकरे आहेत, त्यांना निमंत्रण मिळणार नाही. ज्यांचं राम मंदिराच्या आंदोलनात कोणतंही योगदान नाही, त्यांचा तो सोहळा आहे. आणि ज्याचं योगदान आहे, त्यांना अयोध्येच्या सीमेवरही हे लोक येऊ देणार नाहीत, अशा तीव्र शब्दात राऊत यांनी टीका केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT