Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis on Savarkar : उद्धव ठाकरेंचा मित्र असा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागायला 'मी सावरकर नाही. गांधी आहे. गांधी माफी मागत नसतात', असे विधान केल्याने राज्यासह देशाभरातील भाजप काँग्रेसविरोधात आक्रमक झाली आहे. गांधी यांना उत्तर देण्यासाठी राज्यात भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आज मुंबईतील चारकोप येथे सावरकर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी फडणवीस यांनी सावरकर यांच्या कार्यबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी जातीनिर्मुलनासाठी कार्य केले. मराठी समृद्ध करण्याचे प्रयत्न केले. सावरकरांनी मराठीला महापौर, विधिमंडळासारखे अनेक शब्द दिले. छत्रपती शिवाजीमहाराजांसारखा स्वाभिमान जागा होत नाही तोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असे सावरकर (Veer Savarkar) म्हणाले होते. अशा या सावरकरांची काँग्रेसला नेहमीच भीती वाटली." यानंतर त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली.

फडणवीस म्हणाले, "तुम्ही ज्या पक्षांचे म्हणून सांगता त्या पक्षाच्या इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी सावरकरांचा गौरव केला. आता जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले ते सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवतात. त्यांनी शरम करावी. अशा निर्लज्ज लोकांवर टीकाही करावीशी वाटत नाही." फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाही समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, "सावरकरांचा आपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही मित्र बसलेले आहेत. काँग्रेस रोज सावरकरांचा आपमान करते, मात्र ते शांत बसतात, ही शरमेची गोष्ट आहे."

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगीक होते, असा अंक काढला. पण खुर्ची महत्वाची असल्याचे ठाकरे त्याचा निषेध करू शकले नाहीत. आताही रोज सावरकरांचा आपमान होतान त्यांच्याकडून फक्त आम्हाला हे चालणार नाही, अशा प्रतिक्रिया येतात. मात्र त्यांचे आपमान करणे चाललेलेच आहे. तुमच्यात स्वाभीमान असेल तर तो तुमच्या कामातून, कृतीतून दिसला पाहिजे. शब्दांतील स्वाभिमान फक्त बेगडी असतो. तुमच्यात स्वाभीमान असता तर बाळासाहेबांसारखे तुम्ही राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारले असते. आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आमच्यासोबत आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी केलेले कामही आम्हालाच करावे लागले."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT