Dipesh Mhatre confronts CM Fadnavis over unfulfilled assurances in the RERA 65 building scam.  sarkarnama
मुंबई

RERA 65 Building Scam : रेरा घोटाळातील 65 इमारतील नागरिक होणार बेघर ? ठाकरेंचा शिलेदार आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना करून तिली आश्वासनाची आठवण!

Dipesh Mhatre Devendra Fadnavis : दीपेश म्हात्रे म्हणाले, या प्रकरणातील खरी गुन्हेगार मंडळी म्हणजे विकासक आणि बनावट रेरा दस्तऐवज बनवणारे आहेत. मात्र, प्रशासनाने प्लंबर, फिटर, मिस्त्री आणि अन्य कामगारांवर गुन्हे दाखल केले आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे.

शर्मिला वाळुंज

Shivsena UBT VS BJP : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रेरा घोटाळ्यातील 65 बेकायदा इमारतीत राहणारे अनेक कुटुंब बेघर होणार असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नागरिकांना बेघर होऊ देणार नाही असे सांगितले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांना त्याची आठवण करून देत नागरिकांना वेळ द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. वेळ न दिल्यास मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल ,असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात रेरा घोटाळ्यातील 65 बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. याप्रकरणी खऱ्या दोषींवर कारवाई न करता किरकोळ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्य विकासक आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेघर होणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळ न दिल्यास लवकरच मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला आहे.

दीपेश म्हात्रे म्हणाले, या प्रकरणातील खरी गुन्हेगार मंडळी म्हणजे विकासक आणि बनावट रेरा दस्तऐवज बनवणारे आहेत. मात्र, प्रशासनाने प्लंबर, फिटर, मिस्त्री आणि अन्य कामगारांवर गुन्हे दाखल केले आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. हे बिल्डर मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्यावर कुणा राजकीय पक्षाचा वरदहस्त आहे का, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. या 65 इमारतींमध्ये सुमारे साडे सहा हजार रहिवासी वास्तव्यास असून, त्यांना ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. या इमारतींना महापालिकेच्या वतीने घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येत असून, बँकांचे कर्जही सुरू आहे. प्रशासन त्यांची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना शब्द पाळण्याचे आवाहन

बनागरिकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास मंत्रालयावर मोठ्या आंदोलनाची हाक दिली जाईल, असा इशाराही दीपेश म्हात्रे यांनी दिला. पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, आपण सांगितले होते की, या 65 इमारतीमधील नागरिक कोणी बेघर होणार नाहीत.आता त्या वचनाची आठवण करून देण्याची वेळ आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT