Maratha Reservation News Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : PM मोदी, अमित शहांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?; जरांगेंच्या प्रकृतीवरून राऊतांचा घणाघात

Sachin Fulpagare

Sanjay Raut On Maratha Reservation In Maharashtra : जरांगे पाटलांची प्रकृती ढासळत चालली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काही पर्याय किंवा ठोस उत्तर आहे का? आणि सरकारला नेमका किती वेळ हवा आहे? हा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना भेटावं. त्यांच्याशी चर्चा करावी. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लगता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी, अशी आमची भूमिका आहे. आणि ते करणं केंद्र सरकारच्याच हातात आहे, असं शिवसेना नेते (ठाकरे गट ) संजय राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र मोदी प्रचारात गुंतलेले आहेत. अमित शहा छत्तीसगडपासून मिझोरामपर्यंत फिरत आहेत. आणि महाराष्ट्र पेटला आहे. महाराष्ट्रात लोक आत्महत्या करत आहेत. जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का? त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे का?, असा सवाल करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.

पंतप्रधान मोदींनी फोनवरून त्यांच्याशी बोललं पाहिजे. का तेही बोलायला वेळ नाही? एक-एक तास मन की बात करता रेडिओवरून, जगभरात फिरता, जगभरातल्या नेत्यांना भेटता. पण आमच्या महाराष्ट्राचे सुपुत्र सामाजिक कार्य करतायेत. आपला जीव पणाला लावला आहे समाजासाठी. त्याच्याशी तुम्हाला संवाद साधण्यासाठी वेळ नाही. काय करतायेत उपमुख्यमंत्री? दिल्लीचा मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आहे ना, मग जरांगे पाटलांचे प्राण वाचवा, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

'फडणवीसांचे दिल्ली दौरे जरांगे पाटलांसाठी नाही, तर... '

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यावरूनही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. आपल्या खुर्च्या वाचवायला, मुख्यमंत्री अपात्र ठरणार आहेत त्यांची खुर्ची वाचवायला, आमदार अपात्र ठारणार आहेत त्यांची खुर्ची वाचवायला, विधानसभेच्या अध्यक्षांना काय आदेश द्यावेत ते आदेश आणायला, यासाठी त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यांना कुठे महाराष्ट्राची चिंता पडली आहे, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT