Ranjit Savrkar
Ranjit Savrkar Sarkarnam
मुंबई

Savarkar : 'एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी घडवून आणली!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज रणजीत सावरकर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंडीत नेहरू यांना हनीट्रॅप मध्ये अडकवून देशाची फाळणी करण्यात आली. माऊंटबॅटन यांच्या पत्नीसोबतचे नेहरूंचे पत्रव्यवहार समोर आणावेत असे, रणजीत सावरकर म्हणाले. एका बाईसाठी त्यांनी देशाची फाळणी घडवून आणली, असेही ते म्हणाले.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. भाजपसह ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता रणजीत सावरकर यांबी नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सावरकर यांचं माफी मागितलेलं पत्र दाखवून आरोप केले होते. यावरही रणजीत सावरकर म्हणाले होते, "सावरकरकरांचा यांनी ब्रिटिशांकडे पाठवलेलं पत्र हा इतर कैद्यांना सोडण्यात यावे, यासाठीचा होता. त्यांनी पत्रात कुठेही माफी मागितली नाही, असे रणजीत सावरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT