HItendra Thakur
HItendra Thakur  Sarkarnama
मुंबई

वसईत बहूजन विकास आघाडीचा शिवसेनेला धक्का

संदिप पंडित

विरार : वसई (Vasai) तालुका पंच्यायात समितीच्या पोटनिवडणुकीत दोन जागांवर बहूजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) विजय मिळविल्याने या ठिकाणी सत्तापरिवर्तन होऊन बविआची सत्ता येणार असल्याने बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ओबीसींच्या मुद्यावरून न्यायालयाने पालघर जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या १४ जागांसाठी काल निवडणूक झाली होती. या निवडणुकीची मतमोजणी आज होऊन निकाल जाहीर झाला.

यात वसई पंचायत समितीच्या दोन जागांवर बविआने विजय मिळविल्याने पंचायत समितीमध्ये असलेली भाजप युतीची सत्ता गेली आहे. या निवडणुकीत भाताने गणातून अशोक पाटील तर तिल्हेर गणातून गीता पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी पंचायत समितीवर बविआची सत्ता होती. परंतु महानगरपालिका झाल्यावर त्यात बदल झाला होता. निवडणुकीपूर्वी भाताने आणि तिल्हेर या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. परंतु या निवडणुकीत त्या दोन्ही जागा बविआने घेतल्याने पंचायत समितीमधील सेनेच्या जागा कमी होऊन त्यांच्याकडे एक जागा राहिली आहे. तर भाजप कडे २ जागा राहिल्या आहेत. ८ जागांच्या पंचायत समितीत बविआ कडे आता ५ जागा झाल्याने पंच्यायत समितीमध्ये बविआची निर्विवाद सत्ता आली आहे.

या निवडणुकी नंतर बोलताना बविआचे जेष्ठ नेते नारायण मानकर यांनी सांगितले की, आमचे काम बोलते. कोरोनाच्या काळातही बविआचे कार्यकर्ते सतत नागरिकांच्या बरोबर होते. हे त्यांचेच फळ आहे. या पुढे महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा चागंला विकास करण्याचे ध्येय आमदार ठाकूर यांनी ठेवले आहे.

भाजप-०२,

शिवसेना-०३,

बविआ-०३,

पंचायत समिती,एकूण जागा ०८,

भाताणे व तिल्हेर हे दोन्ही गण सेनेकडे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT