<div class="paragraphs"><p>Ramdas Kadam</p></div>

Ramdas Kadam

 

sarkarnama

मुंबई

शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला वेदना होतील, असे कृत्य करणार नाही...

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'पक्षामुळे व्यक्ती मोठी होते. मात्र, पक्षापेक्षा कोणी व्यक्ती मोठी नसते,' अशा वाक्यांनी भाषणाला शिवसेना (ShivSena) नेते आमदार रामदास (Ramdas Kadam) यांनी सुरुवात केली. कुटुंबात भांडणे होतात; ती विसरून जायची असतात; त्यातून कोणताही निष्कर्ष काढायचा नसतो. तसा माझा स्वभाव आहे, असेही कदम यांनी सांगितले.

यावेळी कदम म्हणाले, मी १९७० मध्ये मी शिवसेनेत काम करण्यास सुरुत केली. अनेक पदे मला शिवसेनेत मिळाली आहेत. मी स्वतःला भाग्यवान समतो. शिवसेना प्रमुखांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडली. पक्षात मतभेत होत असतात. माझा स्वभाव भडक आहे. पक्षामध्ये अनेक ठिकाणी संघर्ष केला. माझे वय ७० वर्ष झाले. त्यामुळे तरुणांना संधी दिली पाहिजे. माझा मुलगा आमदार आहे त्यामुळे मी पूर्ण समाधानी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकेर यांचे शेवटचे भाषण होते. माझ्यानंतर 'उद्धवला साथ' द्या, त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला वेदना होतील असे कोणतेही काम माझ्या हातून होणार नाही, असे कदम म्हणाले.

कदम यांच्यासह अरुण जगताप, प्रशांत जगताप, गिरीचंद्र व्यास, भाई जगताप, गोपीकिशन बजोरिया, अमरिश पटेल, सतेज पाटील या आठ सदस्यांचा कालावधी संपत आहे. मात्र, पटेल, पाटील हे पुन्हा विधान परिषदेत आले आहेत. त्यामुळे अन्य सहाजणांसाठी विधान परिषदेत निरोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेत दुपारी तीन वाजता कामकाजाला सुरवात झाली; तेव्हा निरोपाचा कार्यक्रमाचे नियोजन झाले.

त्यावेळी सभागृहात एकही मंत्री नसल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर सव्वातीन वाजता परब विधान परिषदेत आले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू हेही परिषदेत आले. परंतु गायकवाड आणि कडू काही मिनिटात सभागृहातून निघून गेले. मात्र, परब बसून राहिले; तेही हातातली कामे संपवत होते. परब यांनी सरकारच्या वतीने निवृत्त होणाऱ्या सदस्यांविषयी भाष्य केले नाही. दरम्यान, शिवसेनेत नाराज असलेल्या कदम यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्यावर जोरदार आगपागड केली होती. शिवसेनेत मला आणि माझ्या मुलाला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव परब यांची रचल्याचा घणाघातच कदम यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेतून काढले तरी शेवटपर्यंत एक सच्चा शिवसैनिक म्हणून काम करीत राहणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातल्या परबांवर हल्ला चढविलेल्या कदम यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला कोण येणार, याची उत्सुकता होती. त्यात मात्र परब पहिले आले. शिवसेनेत, विरोधीपक्ष नेते, मंत्रीपदावर असताना कदम यांनी केलेल्या कामांचा गौरव करीत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह दरेकर, शशिकांत शिंदे यांनी कदम यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT