Ashish Shelar, Yashwant Jadhav
Ashish Shelar, Yashwant Jadhav sarkarnama
मुंबई

'त्या' क्लिप शेलारांनी विश्वास नांगरे पाटलांकडे द्याव्यात!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यू झाला. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) चांगलाच वाद रंगला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सभेतही उमटले. सभेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी वादग्रस्त व बेताल विधाने केल्यामुळेच सभागृहात गोंधळ उडाल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसचे त्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भाजपच्या महिला नगरसेविकांनी केला होता. त्यावर आता जाधव यांनी उत्तर दिले आहे.

जाधव म्हणाले, कोणीही गुंड बोलावले नव्हते. ते आमचे शिवसैनिक होते. सभागृहात जी घटना घडली त्या वेळी भाजप नगरसेवकांनीच महिला नगरसेवकांना घोषणाबाजी करायला लावली. भाजप नेते आशिष शेलार यांनी आम्हाला सभागृहातील शिष्ट आणि कायदा शिकू नये. विधानसभा सभागृहात शिस्त न बालगल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असा टोला जाधव यांनी शेलार यांना लगावला. विधिमंडळात जो गोधळ शेलार यांनी केला ती गुंडागर्दी होती, असा आरोपही जाधव यांनी केला. गळा दाबीन असे मी म्हटललेलेच नाही. नायर हॉस्पिटल मधील घटना ही गंभीर आहे. घटना गंभीर होती तिथे कोणी सामान्य माणूस असता तर त्याने कर्मचाऱ्यांचा गळा दाबला असता असे मी म्हंटले आहे. करून दाखविल्यापेक्षा करून निजवले असे शब्द शेलार यांनी वापरला तो कोणत्या शिष्ठाचारात येतो, असा सवार जाधव यांनी केला.

नायर हॉस्पिटलमध्ये भाजप राजकारण करायला गेले. हॉस्पिटलमध्ये ती नगरसेविका गेलेली ही नाही. भाजपने आम्हाला समाजसेवा शिकवू नये. शेलार यांची पत्रकार परिषद ही सेनेच्या द्वेषाने ठासून भरल्याचे पाहायला मिळाले. आलेल्या महापालिका निवडणुकीत पाया खालची वाळू सरकल्याने भाजप बिथरली आहे, असेही जाधव म्हणाले. भाजपचे प्रत्येक नगरसेवक समितीमध्ये आहेत. त्यांच्या समोर प्रस्ताव मंजूर होतात मग ते का बोलत नाहीत, असा सवालही जाधव यांनी केला. शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी नगरसेवकांना बोलू दिले नाही, असेही जाधव म्हणाले.

शेलार यांचा त्यांच्या नगरसेवकांवर विश्वास नाही. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे, असा आरोपही जाधव यांनी केला. माहुलचा प्रस्ताव स्थायी समितीत भाजप नगरसेवक असतांना मंजूर झाला. मग सभागृहात नगरसेवकांनी विरोध कसा केला. भाजपच्या महिला नगरसेविका भगिनी अंगावर धावून आल्या, असे जाधव म्हणाले. माझे आवाहन आहे शेलार यांनी प्रशासनाच्या विरोधात न्यायलायत याचिका दाखल करावी. शेलार यांनी व्हिडिओ तपासून पाहावे त्यात यशवंत जाधव कुठे दिसतात का? शेलार यांनी क्लिप तापसाव्या आणि विश्वास नांगरे पाटील यांना द्याव्यात. माझीही मागणी आहे संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, असेही जाधव म्हणाले.

शेलार काय म्हणाले होते?

शेलार यांनी म्हणाले होते, बीडीडी चाळीत जो सिलेंडर ब्लास्ट झाला. त्यामध्ये नागरिक गंभीर जखमी झाले. त्यामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळक फिरवणारा आहे. नायर रुग्णालयात 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दुर्लक्ष झाले, असा आरोप शेलार यांनी केला होता. यात चार महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला. भायखळ्याचे गुंड सभागृहाबाहेर स्थायी समिती अध्यक्षांनी आणून ठेवले होते. यशवंत जाधव यांनी सभागृहात आमच्या नगरसेविकांना धमकी दिली. कोरोना काळात इतके गुंड सभागृहाबाहेर आणून गर्दी केली. यशवंत जाधव यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT