Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

होय,आम्हीच व्हिलन कारण गद्दारांवर अंधविश्वास टाकला...

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला दररोज धक्के बसत असून पक्षात उभी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत शिवसेनेचे (Shivsena) सुमारे 40 आमदार आपल्यासोबत घेऊन जात राज्यात सत्तांतर घडवलं. यामुळे शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, ते इथेच थांबले नसून त्यांनी आता खासदारांनाही आपल्या गळाला लावले आहे. यामुळे शिवसेना आणि बंडखोर गटामध्ये मोठं शांब्दिक युद्ध रंगत आहे.

दरम्यान, आज मुंबई, कुर्ला येथील नेहरूनगर येथे निष्ठा यात्रेत भाषण करतांना शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर सडकुन टीका केली. आणि जे घडलं त्याला आम्हीच जबाबदार आहोत. कारण आम्हीच डोळे बंद करून गद्दारांवर अंधविश्वास टाकला होता. त्यामुळे आम्ही व्हिलन असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे. (Shivsena Leader Aditya Thackeray Latest News)

आदित्य म्हणाले, शिवसेनेसोबत गद्दारी करणारांना पक्षाने काय कमी केलं होतं? जिल्हयाचे पालकमंत्री आणि इतर महत्वाची पद दिली ही चूक झाली का? यासाठी आम्हीच व्हिलन असून त्याला आम्हीच जबाबदार आहोत. कारण आम्ही यांच्यावर अंधविश्वास टाकला म्हणून त्यांनी आमचा विश्वासघात केला, अशा शब्दात आदित्य यांनी बंडखोरांना सुनावले.

ठाकरे आणि शिवसेना परिवार काही वेगळा आहे का? यापुढे सामान्य व्यक्तीला असामान्य ताकत देण्याची ओळख कायम राहणार आहे. पुढच्या वेळचा आमदार याच गर्दीत बसलेला आहे. गद्दारांना सांगतो, ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी आजही दरवाजे खुले आहेत. नाहीतर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून येऊ दाखवा, असे पुन्हा एकदा त्यांनी आव्हान दिले.

ते पुढे म्हणाले, शिवसैनिकाचे संस्कार असते तर इमारत कोसळली तेव्हा धावून आले असते. बंडखोर सांगतात की उद्धव साहेब भेटत नव्हते. फेसबुकवरून उद्धव साहेब बोलले ते तुम्ही ऐकलं असेल, सत्ता येते आणि जाते पण नाव गेलं तर ते पुन्हा येत नाही. वर्षा तेव्हा आपण सोडलं, कारण जे आपलं नाही त्याला चिटकायचं नाही, उद्धव साहेब काहीकाळ भेटत नव्हते हे खरं आहे, पण जरा बरं वाटल्यावर लगेच कामाला लागले. ज्यांनी आपल्याला तिकीट दिलं. आपला प्रचार केला, त्यांच्या आजारपणात आपल्याला काय अधिक मिळेल हे जमवण्यासाठी गद्दारी केली. मात्र लोकांना ठाऊक आहे की, उद्धव ठाकरे हे सच्चा माणूस आहे. मी राजकारणात आलो तेव्हा मला सांगितलं जायचं की, राजकारणात चांगल्या माणसांना जागा नसते. पण राजकारणात चांगल्या माणसाला स्थान असतं, हे आपण दाखवून देणार आहे. आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशा शब्दात आदित्य यांनी हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT