Vinayak Raut, Narayan Rane
Vinayak Raut, Narayan Rane sarkarnama
मुंबई

राणेंनी आपलं मंत्रिपद संभाळावे; मग महाविकास आघाडीची काळजी करावी...

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : ''राणे यांनी अनेकवेळा सरकार पडेल असं विधान केलं होतं. त्यामुळे राणेंनी बोलावं आणि महाविकास आघाडी सरकार पडावं, अशी स्थिती नाही. त्याउलट राणेंनी आपलं मंत्रीपद सांभाळावं. मग, महाविकास आघाडी सरकारची काळजी करावी,'' असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

नारायण राणे यांनी जयपुरमध्ये मार्च महिन्यामध्ये भाजपचं सरकार येईल, असे खळबळजनक विधान केलं होतं. याचा खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला. श्री. राऊत म्हणाले, नारायण राणे यांच्या अशा वक्तव्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. माझ्या मते त्यांचं हे विधान आठवे किंवा दहावे आहे. प्रत्येक वेळी त्यांना बोलून सोडून द्यावं यामध्येच समाधान मिळतं. राणेंनी बोलावं आणि महाविकास आघाडी सरकार पडावं, अशी स्थिती नाही. त्याउलट राणेंनी आपलं मंत्रीपद सांभाळावं. मग, महाविकास आघाडी सरकारची काळजी करावी,''असा टोला त्यांनी लगावला.

तसेच चिपी विमानतळावर जंगली प्राण्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे विमान सेवेला अडथळा निर्माण होत आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी विमानतळावरील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्याचं असं विनायक राऊत म्हणाले. चिपी विमानतळाच्या चारी बाजूने आवार भिंत आहेच, या भागात जंगली प्राणी म्हणजे कोल्हे विमानतळावर येतात. मुख्य गेटवर तिथे सातत्याने पहारा ठेवा तिथल्या जाळ्या व्यवस्थित बसवा, अशा सूचना एअरपोर्ट आयआरबीला दिलेले आहेत, असे त्यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT