Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत 40 अर्बन नक्षली संघटनांचा सहभागी झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे CM फडणवीसांच्या आरोपांवर कडाडले आहे.
"हे तुम्ही कोण ठरवणार, तुमच्या आवतीभोवती कोण आहे, या यात्रेत संपूर्ण राज्यातील, देशातील लोक सहभागी झाले होते. मी होतो. तोंडात काहीही येईल, ते बोलायचे का?", अशा शब्दात खासदार राऊत हे फडणवीसांवर कडाडले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षली, हे ठरवणारे कोण? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे कोणते माप आहे?, असे प्रश्न करत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. राऊत म्हणाले, "राहुल गांधी यांच्या या यात्रेत अनेक निवृत्ती अधिकारी, निवृत्ती लष्करी अधिकारी, कलाकार, काँग्रेस नेते, अखिलेश यादव, मी स्वतः सहभागी झालो होतो. मी काय अर्बन नक्षलवादी आहे का?"
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या यात्रेत, पुण्यात अमोल पालेकर देखील सहभागी झाले होते. तोंडात काहीही येईल, ते बोलायचे का? आता सत्ता आहे म्हणून बोलता का? केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवाद संपवला असल्याचे विधान केले होते. फडणवीस यांचे आता हे विधान त्यांच्याच केंद्रीय गृहमंत्र्यांना आव्हान देत आहेत. आम्ही सर्व नक्षलवादी का? तुम्ही कोण आहात, तुमच्या आवतीभोवती कोण आहे, हे एकदा फडणवीसांचा तपासावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना, काँग्रेस राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत 40 नक्षली संघटना सक्रिय होत्या, असा गंभीर आरोप केला. त्यासाठी त्यांनी 2012 मध्ये तत्कालीन भाजप आमदार गिरीश बापट यांनी विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या उत्तराचा आधार घेतला होता. महाराष्ट्रातील काहीप्रमुख संघटनांची नावे आर. आर. पाटील यांच्या उत्तरात शहरी नक्षल संघटना म्हणून आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या आरोपांवर काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी देखील या संघटनांच्या नावाची मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना अनेक वर्षांपासून सामाजित हितासाठी कामे करत आहेत. अशा संघटनांना मुख्यमंत्री यांनी अर्बन नक्षली संबोधने चुकीचे आहे, असा पटोले यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.