<div class="paragraphs"><p>Vijay Vadettiwar</p></div>

Vijay Vadettiwar

 

sarkarnama

मुंबई

धक्कादायक : राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले. शेतकरी आत्महत्यांविषयी धक्कादायक माहिती आज अधिवेशनात सादर करण्यात आली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली आहे. आर्थिक मदत आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर वडेट्टीवारांनी हे उत्तर दिले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ''जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांमधून जिल्हास्तरीय समितीने 491 पात्र ठरवल्या. तर 213 आत्महत्या अपात्र ठरवल्या. तर 372 प्रकरणे ही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र असलेल्या 491 पैकी 482 जणांना मदतही दिली,''

''पाच महिन्याच्या कालावधीतील यापैकी 491 प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली आहेत. शिवाय त्यांना आर्थिक मदतही दिली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे,'' असे वडेट्टीवार म्हणाले.

नियम डावलून विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात सरकारला रस चंद्रकांत पाटील

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनुपस्थितीमुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करुन मुख्यमंत्रीपद रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावे, असा टोमणा लगावला आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

''राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही,'' अशी बोचरी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी आज पुन्हा टि्वट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या टि्वटमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, ''मविआ सरकारचा अधिवेशनातील रस हा ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे, १९ विधेयके संमत करून घेणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम डावलून आवाजी मतदान पद्धतीने घेणे यापुरताच आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT