Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Brand : "ब्रँड असता तर..."; शिंदेंच्या आमदाराने थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत 'ठाकरे ब्रँड'वर उपस्थित केली शंका

Sanjay Gaikwad On Thackeray Brand : मनसे आणि ठाकरेंच्या समर्थकांकडून राज्यात फक्त 'ठाकरे ब्रँड' चालणार दुसरा कोणता नाही, असं म्हटलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या एक्स अकाऊंटवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'ठाकरे ब्रँड' असं लिहिलं आहे.

Jagdish Patil

Sanjay Gaikwad On Thackeray Brand : राज्यातील हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

यानिमित्ताने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे जवळपास 20 वर्षांनी एकत्र आले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवं समीकरण तयार झाल्याचं बोललं जात आहे.

तर मनसे आणि ठाकरेंच्या समर्थकांकडून राज्यात फक्त 'ठाकरे ब्रँड' चालणार दुसरा कोणता नाही, असं म्हटलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या एक्स अकाऊंटवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'ठाकरे ब्रँड' असं लिहिलं आहे.

मात्र, विरोधकांकडून आता ठाकरे ब्रँड वगैरे काही नसल्याची टीका केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर ठाकरे ब्रँड या शब्दावरून थेट बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत ठाकरे ठाकरे ब्रँड नसल्याचं म्हटलं आहे.

ठाकरे ब्रँड असता तर बाळासाहेब हयात असतानाच शिवसेनेचे 288 आमदार निवडून आले असते, असं आमगार गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, ठाकरे बंधू 15 वर्षांपूर्वी एकत्र आले असते, तर काहीतरी परिणाम जाणवला असता. मात्र, उद्धव ठाकरे आता बाळासाहेबांचा विचार सोडून गेलेत. राज ठाकरेंनी देखील टाळीला टाळी द्यायला खूप उशीर केला आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्रात फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही.

दरम्यान, यावेळी त्यांनी ठाकरे ब्रँड संदर्भात वक्तव्य करताना थेट त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत ठाकरे ब्रँड वर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, "ठाकरे ब्रँड आता राहिलेला नाही. आता तुम्ही लोकांची किती कामं करता, त्यांच्या किती संपर्कात राहता, यावर सगळं अवलंबून आहे. जर ठाकरे नावाचा ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच 288 आमदार निवडून आले असते. तेव्हा पण आपण 70-74 च्या पुढे कधी गेलो नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT