Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi : 'भारत जोडो' अभियानातंर्गत काँग्रेसचा राज्यातील पहिला मेळावा कोल्हापुरात

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेड मधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. यात्रेची जय्यत तयारी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त कोल्हापूरमध्ये शनिवारी काँग्रेसचा मेळावा होणार आहे. काँग्रेस आमदार माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी याबाबत माहिती दिली. भारत जोडो अभियानअंतर्गत राज्यातील हा पहिलाच मेळावा असणार आहे.

या मेळाव्याला दिग्विजय सिंह, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले उपस्थितीत राहणार आहेत. शाहू समाधी स्थळाला अभिवादन करून अभियानाची सुरुवात होणार आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता दसरा चौकात काँग्रेस नेत्यांची सभा होणार आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

दुसरीकडे, कोल्हापूर काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचे नियोजन सुरु आहे. राहुल यांची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकमध्ये आहे. कोल्हापूर काँग्रेस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात स्क्रीनद्वारे भारत जोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली आहे. या यात्रेचा समारोप जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार आहे. एकूण 3 हजार 500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाईल. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT