Uday Samant|
Uday Samant| Sarkarnama
मुंबई

'बाळासाहेबांची शिवसेना' नावामुळे काहींच्या पायाखालची वाळू घसरली : सामंतांचा हल्लाबोल!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचं चिन्हं गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 'मशाल' चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटालाही 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह आयोगाकडून मिळाले आहे. त्यामुळे आता अंधेरीपूर्व पोटनिवडणूकीत ठाकरे गट आणि शिंदे गट किंवा भाजपचा उमेदवार असा सामना होणार आहे. दोन्ही गटांकडून दावे - प्रतिदावे होत आहेत. यावरूनच आता राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला.

सामंत म्हणाले, "अंधेरी पोटनिवडणूकीत आमचा शिवसेना बाळासाहेबांची आणि भाजप युतीचा उमेदवार असेल. आमचाच उमेदवार त्या ठिकाणी बहुमताने निवडून येईल. ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाचा दबाव आहे, असे संभ्रमाचं वातावरण निर्माण ठाकरे गटाकडून निर्माण करण्यात येतय. चांगलं घडलं तर आमच्यामुळे झालं, वाईट घडलं तर शिंदे गटामुळे झालं, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे.

"कधीतरी विकासाचं बोललं पाहिजे. कायमस्वरूपी गद्दार, बाटगे, बोललं जातंय. याला महाराष्ट्र विटलाय. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यामुळे काही जणांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, असेही सावंत म्हणाले. दरम्यान, अंधेरीपूर्व पोटनिवडणूकीत नवेनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत.

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्याने राजीनाम्याशिवाय त्यांना ही पोटनिवडणूक लढवता येणार नाही. परंतु त्यांना निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी राजकीय दबावामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT