बातमीत थोडक्यात काय?
मोहन भागवत यांचे सूचक विधान : नागपुरात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी "पंचाहत्तरी झाल्यावर थांबावं" असं विधान केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया : उद्धव ठाकरे यांनी 'सामना’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की भागवतजी कुठलाही विधान उत्तराशिवाय करत नाहीत. त्यामुळे ‘मोदींनंतर कोण?' याचं उत्तर संघाकडे आधीच तयार असण्याची शक्यता त्यांनी सूचित केली.
Uddhav Thackeray on Modi Retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच नागपुरमधील एका कार्यक्रमात जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा तुम्ही थांबावं, असं वक्तव्य केलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पंचाहत्तरीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. यावरून अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
मोदींनंतर कोण याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. त्यांच्याकडे उत्तर असेल म्हणूनच कदाचित मोहनजी असे बोलले असतील, ते बिना उत्तराचं नाही बोलणार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
या मुलाखतीत ठाकरेंना सत्ताधाऱ्यांबाबत काही प्रश्न विचारले यावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा व्यापार केला आहे, आता देशाचाही व्यापार करत आहेत, शिवाय देशाला पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्रीही नाही. एक नंबरचे कचखाऊ आहेत, अशी टीका केली.
याचवेळी मोदींना 75 वर्षे पूर्ण होत आहेत, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, "पंचाहत्तरीची शाल सरसंघचालक भागवतजींनी मोदींना घातलेली आहे. गम्मत आहे." तर 75 वर्षे झाली की भाजपमध्ये कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही.
असं राऊतांनी म्हणताच, उद्धव ठाकरे म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात; पण यांच्याबाबतीत ती वंदावी की वाकुडी यांची पाऊले आहेत हे कळेल. दरम्यान, पंडित नेहरूंनंतर एक प्रश्न होता. ‘आफ्टर नेहरू हू?’ किंवा ‘आफ्टर इंदिरा हू?’ ‘तसं आफ्टर मोदी हू…? असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींनंतर कोण हा भाजपचा अंतर्गत विषय आहे.
त्यावर कदाचित त्यांचा विचार सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. त्यांच्याकडे उत्तर असेल म्हणूनच कदाचित मोहनजी असे बोलले असतील, ते बिना उत्तराचं बोलणार नाहीत, ठाकरेंच्या या विधानामुळे आता खरंच संघाने मोदींना पर्याय शोधलाय का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
प्रश्न: मोहन भागवत यांनी नेमकं काय विधान केलं?
उत्तर: त्यांनी म्हटलं की "पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा थांबावं लागतं."
प्रश्न: उद्धव ठाकरे यांनी या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: त्यांनी सूचित केलं की संघाकडे 'मोदींनंतर कोण?' याचं उत्तर आधीच असू शकतं.
प्रश्न: मोदींच्या निवृत्तीची चर्चा का सुरू झाली?
उत्तर: कारण मोदी 75 वर्षांचे होत असून, भाजपमध्ये त्या वयानंतर सत्तेत राहण्याची परंपरा नाही.
प्रश्न: उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर काय टीका केली?
उत्तर: त्यांनी सत्ताधाऱ्यांना “देशाचाही व्यापार करणारे आणि कचखाऊ” असे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.