Nitesh Rane-Thackeray Family Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं कुटुंबच गुजराती व्यापार मंडळाचे प्रमुख लाभार्थी; नीतेश राणेंचा पलटवार

Vijaykumar Dudhale

Mumbai, 09 September : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर टीका करताना सर्वकाही गुजराती व्यापार मंडळाचा फायद्यासाठी सर्वकाही सुरू आहे, असे म्हटले होते.

त्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुजराती व्यापार मंडळाचे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे चार प्रमुख लाभार्थी आहेत, असा घाणाघात राणे यांनी राऊतांवर केला.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपाला उत्तर देताना आमदार नीतेश राणे (Nitesh Rane ) म्हणाले, पत्राचाळीतील मराठी माणसांचे भविष्य अंधारात आणणाऱ्या, त्यांना बरबाद करणारे श्री 420 संजय राऊत आज सकाळी उठून गुजरातच्या व्यापारी मंडळाबद्दल फार भुंकत होते. पण, गुजरात व्यापारी मंडळाचे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेच चार प्रमुख लाभार्थी आहेत.

ठाकरे यांच्या घरातील प्रत्येक वस्तू ही गुजरात व्यापारी मंडळाच्या माध्यमातूनच येते. असं नसेल तर संजय राऊत यांनी माझ्यासमोर बसावं आणि स्पष्टीकरण द्यावं.

एका बाजूला तुझे मालक, मालकीण आणि त्यांची दोन्ही मुलं गुजरात व्यापारी मंडळाच्या आधारावर आपलं आयुष्य जगत आहेत...मग तुम्ही कुठल्या तोंडाने गुजराती समाजाला नावे ठेवत आहात?, असा सवालही नीतेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना केला.

तुम्हाला जर आपल्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर जाऊन बघा, अंबानी यांच्या घरी प्रसाद वाटण्यासाठी, चपला उचलण्यासाठी नेमकं कोण उभा आहे? म्हणून मराठी माणसाची खरीच काळजी असेल, तर आधी पत्राचाळीतील मराठी माणसाची चिंता करावी, असा सल्लाही नीतेश राणे यांनी दिला.

आमदार राणे म्हणाले, तुमच्यामुळे आणि तुमच्या मालकामुळे पत्राचाळीतील लोकांचं आयुष्य बरबाद झालेली आहेत. त्याबद्दल आधी बोला आणि मगच मराठी माणसांची चिंता करा.

संजय राऊत काय म्हणाले होते?

गुजराती व्यापार मंडळाचा फायदा व्हावा, यासाठीच भाजपे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आम्हाला भीती वाटते की, जे जे वैभवाचे आणि प्रतिष्ठेचे आहे, असे सर्व ओरबडून नेणार असतील तर काल देशाचे गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.

त्या वेळी आम्हाला भीती वाटली की ‘लालबागचा राजा’ हे अहमदाबाद किंवा गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना? ही लोकांच्या मनातील भीती आहे. अमित शाह हे अनेकवेळा मुंबईत आले होते. मात्र आम्ही हा प्रश्न या अगोदर निर्माण केला होता का? मात्र, आता हे भय वाढले आहे. सत्तेच्या बळावर हे काहीही उचलून नेऊ शकतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT