Mumbai News, 13 Feb : बारावीची बोर्डाची परीक्षा (12th Board Exam) नुकतीच काही दिवसांपूर्वीच संपली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र, अशातच आता विद्यार्थ्यांनी दिलेले पेपर सुरक्षित आहेत का आणि त्यांचे पेपर काळजीपूर्वक तपासले जात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे एका शिक्षिकेने घरी तपासण्यासाठी आणलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे.
या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर शिक्षिकेच्या निष्काळजीपणा विरोधात विध्यार्थी आणि पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. शिवाय हे पेपर घरी का नेले? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये (Virar) राहणाऱ्या एका शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. हा पेपरचा गठ्ठा सोफ्यावर ठेवला होता. त्यानंतर घरातील लोक बाहेर गेले असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घरात आग लागली. त्यामध्ये घरातील सामानासह पेपरही जळून खाक झाले.
दरम्यान, आता पेपर जळाल्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, या शिक्षिकेने घरी का नेले आणि उत्तपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय होणारं? पेपर जळालेत्यांची पुन्हा परीक्षा होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत?
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.