Election Commission
Election Commission sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : ग्रामपंचायतींसाठी आता 13 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (GramPanchayat Election) 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केले आहे.

तर मतमोजणी 14 ऑक्टोबर ऐवजी आता 17 ऑक्टोबरला होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7. 30 ते सायंकाळी 5. 30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल.

मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT