Husain Dalwai Sarkarnama
मुंबई

प्रभाग पद्धत अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारी...

अल्पसंख्यांक समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तीन सदस्यांच्या प्रभागामुळे मुस्लिम उमेदवारांवर अन्याय होणार आहे. गरिब अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण आवश्यक आहे. त्याकडे लक्ष न देता तीन सदस्यांच्या प्रभागासारखे निर्णय घेवून प्रतिनिधित्वाचा गळा घोटण्याचे जे प्रयत्न होत आहेत, ते दुर्दैवी आहेत, अशी भूमिका ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभेचे माजी सदस्य हुसेन दलवाई यांनी मांडली आहे.

ते 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले," महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी होईल, अशी समाजाला आशा आहे. गरिब अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण आवश्यक आहे. त्याकडे लक्ष न देता तीन सदस्यांच्या प्रभागासारखे निर्णय घेवून प्रतिनिधित्वाचा गळा घोटण्याचे जे प्रयत्न होत आहेत, ते दुर्दैवी आहेत.

केवळ एक स्त्री आणि एक पुरुष अशा दुहेरी सदस्यत्वाचा प्रभाग असावा. अल्पसंख्यांकांच्या आकांक्षांवर पाणी फेरणारे निर्णय घेतले जावू नयेत. आपण पक्षनेतृत्वाशी याबद्दल चर्चा करणार आहोत. अल्पसंख्यांक समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देणे ही काँग्रेसची जबाबदारी असून तीन सदस्यांच्या प्रभागामुळे मुस्लिम उमेदवारांवर अन्याय होणार असल्याची भूमिका व्यक्त केली जाते आहे.

प्रभागाचा आकार मोठा असतो, धार्मिक मुद्द्यांवर देशात प्रचंड हाकाटी सुरु असते. अशा वेळी अल्पसंख्यांकांना वॉर्डाचा आकार लहान असला तरच निवडून येणे शक्य आहे हे लक्षात घेवून निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT