Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असे सिद्ध झाले तर... अजितदादांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Amol Jaybhaye

Jalna Andolan News : जालन्यातील अंतरवली सराटी गावामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले होते. त्यावरून संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघत आहेत. तसेच विरोधी पक्षानीही राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश हे मंत्रालयातून आल्याचा आरोप करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर लाठीचार्जचे आदेश जर मंत्रालयातून आले असे सिद्ध झाले तर आम्ही राजकारणात राहणार नाही, असी रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भात समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मागे घेण्याचे आवाहन केले. जालन्यात घडलेली घटना चुकीची आहे. मी दोन दिवस मी आजारी असल्यामुळे बाहेर पडलो नाही. त्या माध्यमातून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आम्ही अनेक वर्ष काम करतो. त्या वेळेस सर्वांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. काही जणांनी त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठी काम करावे लागले. देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असताना उच्च न्यायालयात आरक्षण टिकले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. मात्र, त्यावर ठोस असे कारण मिळले नाही. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. आवाहन करतो, जे काही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने चालू आहेत, ती थांबवली पाहिजे.

मागे अनेक आंदोलने झाली मात्र, ती शांततेत झाली. आजच्या बैठकीत सकारात्म चर्चा झाली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आणि राज्य सरकारच्या वतीने गिरीश महाजन जालन्यात आंदोलकांना भेटायला गेले होते. मराठा समाजाला आवाहन करायचे आहे, त्यांच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन थांबवली पाहिजे, इतरांना त्रास होईल, असे कोणतेही काम करू नका. नुकसान कुणीही करू नये, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका आहे. आपली जी काही अपेक्षा आहे, जी काही मागणी आहे, त्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT