Ramdas Kadam
Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

खरी 'शिवसेना' कोण? दसरा मेळाव्यातच स्पष्ट होईल : रामदास कदमांचा इशारा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट यांच्यातल्या वादाला धार येत आहे. शिंदे सरकारला खोके सरकार आणि गद्दार म्हणत निशाणा साधला जातो. तर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या या टीकेवर पलटवार करण्यात येतो. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. "त्यांनी खोके आणि गद्दार म्हणण्यापलीकडे अडीच वर्षात काय केलं? असा प्रश्न कदम यांनी विचारला

कदम यांनी आदित्य ठाकरे यांना उद्दशून सातत्याने 'खोके सरकार' आणि 'गद्दार' म्हणून होणाऱ्या टीकेवर भाष्य केले आहे. कदम म्हणाले, फक्त खोके आणि गद्दार एवढचं ते म्हणतात. मात्र सरकारमध्ये असताना गेल्या अडीच वर्षात त्यांनी जनतेसाठी काय केलं? हे एकदा त्यांनी सांगावं, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी कदम यांनी दसरा मेळाव्यावरूनही ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कदम यांनी दसरा मेळाव्याचा उल्लेख करत ठाकरेंना लक्ष्य केले आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्क मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उर्जा भरली आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. यावर बोलताना कदम यांनी म्हटले की, खरी शिवसेना कोणाची हे दसरा मेळाव्यामध्येच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT