<div class="paragraphs"><p>Prithviraj Chavan </p></div>

Prithviraj Chavan

 

sarkarnama

मुंबई

विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात पुन्हा एकदा तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे, तर १२ आमदारांचे निलंबन मागे घेतले जावे यासाठी भाजप आग्रही आहे. याच दोन मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे एकमत होवून तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे.

शुक्रवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही अध्यक्षपदाची निवड झालेली नाही, मात्र निवडणुकीचे तारीख ठरविण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सोमवारी अध्यक्षपदाचा अर्ज भरला जाणार आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपदाचा अर्ज भरला जाणार आहे. परंतु उमेदवार कोण असणार? हे अद्यापही समोर आलेलं नाही. २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल.

आज कामगार सल्लागार समितीची बैठक होती, या बैठकीत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम ठरला. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नवा अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि के.सी. पाडवी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ''पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल,"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदासाठी आजपासूनच प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसेच २७ किंवा २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी हाय कमांड आता निर्णय घेणार असून पुढील २ दिवसांमध्ये त्याबाबत आपल्याला माहिती मिळेल, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत म्हणाले, ''मविआ सरकारचा अधिवेशनातील रस हा ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे, १९ विधेयके संमत करून घेणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम डावलून आवाजी मतदान पद्धतीने घेणे यापुरताच आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT