Deven Bharti, Devendra Fadnavis
Deven Bharti, Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

IPS Deven Bharti News : देवेन भारतींच्या विशेष पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीमागे 'हे' आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

IPS Deven Bharti News : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त (Mumbai Police) म्हणून देवेन भारती (Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच भारती यांना देण्यात आलेल्या नियुक्तीमागे काय कारण आहे याचे ठोकताळे देखली बांधले जात आहेत.

त्यानुसार राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेमध्ये देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. तसचे मुंबई महापालिकेच्या निमित्ताने ही नियुक्ती करण्यात आली असल्याचेही चर्चा आहे. तसेच फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर गृह खात्यात पुन्हा आपला जम बसवण्यासाठी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

अगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईत घेरण्यासाठी भाजपने रणनिती तयार केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे यांची मुंबई महापालिकेतील सत्ता खालसा करून भाजपचा (BJP) महापौर करायचा. त्यासाठी मुंबईमध्ये मर्जीतील अधिकारी हवा, यासाठी भारती यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राजकीय राणकारांचे मत आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालपदाच्या अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेच्या यातीच देवेन भारती यांचा १७ वा क्रमांक आहे. तरीही त्यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळेही विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारती हे 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा भारती यांच्यावर सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) जबाबदारी होती. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले होते.

मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरुन भारती यांना हटवण्यात आले. त्यानंतर भारती हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. भारती फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व गृह खाते फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात गृह खात्यावर आपले पूर्ण नियंत्रण आणण्यासाठी फडणवीसांनी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यातूनच भारती यांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT