Dr. Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : ''राम मंदिराचं उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल, तितकीच...'' ; अमोल कोल्हेंचा मोदी सरकारला टोला!

Sudesh Mitkar

Pune News : महाविकास आघाडीच्यावतीने पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक बुधवारी पुण्यात पार पडली या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मोदी (Modi) सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. तसेच, या देशात रामराज्य येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

याचबरोबर खासदार कोल्हे म्हणाले, ''राम मंदिराचे उद्घाटन होतय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र केवळ धनुष्य ताणलेला राम नाही तर आशीर्वादाचा हात वर केलेला कुटुंबवत्सल प्रभू श्री राम देखील आमचा देव आहे. आम्ही देखील नतमस्तक होऊ, मात्र देशात रामराज्य आलं पाहिजे ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय ''हजारो कोटी लोकांची राम मंदिर व्हावे ही इच्छा होती. त्यामुळे ती पूर्ण झाली याचा आनंद आहे.मात्र मला कार्यक्रमाच निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. मात्र माझी एवढीच अपेक्षा आहे की राम मंदिराचे उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल तितकीच मोठी जबाबदारी रामराज्य आणण्याची देखील आहे. याची जाणीव देखील सरकारने ठेवावी.'' असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी सरकारला लगावला.

याचबरोबर ''हजारो कोटी लोकांची राम मंदिर व्हावे ही इच्छा होती. त्यामुळे ती पूर्ण झाली याचा आनंद आहे. मला कार्यक्रमाचं निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. मात्र माझी एवढीच अपेक्षा आहे की राम मंदिरचे उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल तितकीच मोठी जबाबदारी रामराज्य आणण्याची देखील आहे. याची जाणीव देखील सरकारने ठेवावी, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी सरकारला लगावला.

याचबरोबर, ''गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. मात्र हे महाराष्ट्रातील सरकार हे फक्त फोटो काढून घेण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते कोणीही गंभीर दिसत नाही. त्यामुळे 27 डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारला फक्त मन की बात ऐकायची आहे, जन की बात ऐकायची नाही. त्यामुळे या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे.'' असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच खासदार निलंबनाबाबत बोलताना कोल्हे म्हणाले, ''मी आणि खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांचं निलंबन होणे हा चर्चेचा विषय होता. कारण आम्हा दोघांनाही संसदरत्न म्हणून गौरविण्यात आलं आहे. असं असताना शेकाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही प्रश्न विचारता होतो, तेव्हा आमचे निलंबन केले. खासदारांचे निलंबन करून सरकारने विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे.'' अशी टीका त्यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT