Brujbhushan Singh : Raj Thackeray
Brujbhushan Singh : Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Brujbhushan Singh : बृजभूषण सिंग यांनी पुण्यात पाऊल ठेवलं, पण मनसेने विरोध गुंडाळून ठेवला!

सरकारनामा ब्यूरो

Brujbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध केला होता. आता सिंग यांनी पुण्यात पाऊल ठेवले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने ते पुण्यात आले आहेत. मात्र मनसेने सिंग यांना विरोध केलेला नाही. यामुळे आता मनसेने विरोध का गुंडाळून ठेवला याबाबत चर्चा होत आहे.

राज ठाकरे यांनी जून २०२२ मध्ये अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी आक्रमक भूमिका घेऊन राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. मनसे आणि राज ठाकरेंकडून नेहमीच उत्तर भारतीयांचा अपमान झाला, उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात मारहाण केली गेली.त्यामुळे उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाया ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातत्यांनी आंदोलनाची तयारीही केली होती.

सिंग यांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरेंनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देत, अयोध्या दौरा रद्द केला होता. यावेळी ब्रिजभूषण सिंग आणि मनसेमध्ये शाब्दिक चकमक घडून आले होती. ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येतील तेव्हा बघून घेऊ, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले होते. पु्ण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्प प्रतिष्ठाण यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. सिंह हे मागील दहावर्षांपासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. यामुळे ते या कुस्तीच्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून पुण्यात येत आहेत. मात्र आता सिंग यांना मनसेने विरोध केला नाही.

सिंग हे पुण्यात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, महाराष्ट्रात आले तर राज ठाकरे यांना भेटणार का?, असा प्रश्न विचारल्यावर सिंग म्हणाले की, "जर राज ठाकरे मंचावर आले, तर त्यांना नक्कीच भेटणार. राज यांच्याशी माझं वैयक्तिक शत्रुत्व नाहीये." राज ठाकरेंनी सिंग यांना महाराष्ट्रात येण्यासाठी विरोध दर्शवला नाही. या मनसेच्या या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे.

सिंग पुढे म्हणाले, "मागील काळात या महाराष्ट्रात उत्तर भारतीय नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरेंनी क्षमा मागावी, अशी मागणी मी केली होती. कदाचित राज ठाकरे यांनाही ही बाब माहीत नसेल, मनसेच्या लोकांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला होता. परंतु आता हा मु्द्दा संपलेला आहे. ते दिवस आता मागे गेले. महाराष्ट्र राज्य नेहमीच कुस्ती खेळाचं राज्य राहीले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जगातील कुस्तीचे पहिले मैदान या महाराष्ट्रातच बनवले. तेव्हापासून कुस्ती खेळाचं नाव मोठं आहे. महाराष्ट्रात लाखो कुस्तीप्रेमी येतात, असेही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरेंचे भाजप नेत्यांशी सातत्याने होणाऱ्या भेटी, भाजप बरोबर वाढलेली जवळीक, भविष्यात भाजप बरोबर युतीची शक्यता आणि भाजपची नाराजी न ओढवून घेण्याचा मुद्दा, यामुळे मनसेने आपली आक्रमक भूमिका गुंडाळून ठेवली का? अशा चर्चांना उधाण येत आहे. नुकतेच राज यांच्या निवासस्थानी मोठे उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली होती. यानंतर लगोलग राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामुळे राज ठाकरे भाजपशी वाढलेली जवळीक यामुळे त्यांनी सिंग यांना विरोध केला जात नाही, अशी चर्चा होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT