Pune News : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी एकापाठोपाठ झालेल्या कारवायांमुळे पोलिस प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तसेच पोलिसांबरोबरच सरकारचा दबावही वाढू लागला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) आता या प्रकरणात लक्ष घातल्यानं मोठ्या कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पुणे दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. यादरम्यान, त्यांची मराठा (Maratha) समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. पुण्यातील कार्यक्रम आटोपून नागपूरच्या दिशेने निघाले असताना पुणे विमानतळाजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आला. घटनेतील मुख्य आरोपीला लवकरात लवाकर अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी लक्ष घातलं असून सर्वांना नीट करणार,कोणालाही सोडणार नाही,असं आश्वासन मराठा समाज बांधवांना दिलं आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात उमटल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. मराठा समाजाकडून देखील या मागणीवर जोर देण्यात आला होता.
मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या हत्येच्या तपासावर देखील राजकीय नेत्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आश्वासन दिल आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण थेट दिल्लीत पोचल्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर मुख्य आरोपीसह इतरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबद्दल असलेला संशय पाहता केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या कारवाईने बीड पोलीस प्रशासन हादरले आहे. मस्साजोग येथून सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.