Sharad Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'बारामतीकरांच्या मनातील सूनबाई दिल्लीला नक्की जाणार'; फडणवीस यांचा शरद पवारांना टोला !

Chaitanya Machale

Baramati Political News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झाला आहे. केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. यानिमित्त आयोजित प्रचार सभेत उपस्थित मान्यवरांनी जोरदार बॅटिंग करून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांमुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. ही गर्दी पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बारामतीचा फैसला या सभेनेच केला आहे.

आता आपल्याला केवळ घरोघरी पोहाेचून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणायचे आहे. सुनेत्राताई या कोणी बाहेरच्या नाहीत तर बारामतीकरांच्या (Baramati) मनातील सूनबाई आहेत.

त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये बारामतीत मोठे काम केले आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या मनातील सूनबाई निश्चितपणे दिल्लीला जातील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक पवारसाहेब विरुद्ध अजितदादा नाही. सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई अशी नाही. ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक असून, नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी (Rahul Gandhi) अशी निवडणूक आहे.

त्यामुळे या निवडणुकीत विकासाला की विनाशाला मतदान करायचे, याचा निर्णय तुम्हाला ठरवायचा आहे. या निवडणुकीत भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र कोणत्याही भावनिक आवाहनांना बळी पडू नका, असेही फडणवीस म्हणाले.

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास तुम्ही बघितला. तरुण, महिला, नोकरदार, व्यावसायिक, शेतमजूर, अल्पसंख्याक समाज यांच्यासाठी गेल्या दहा वर्षांत मोदींनी अनेक योजना राबविल्या.

त्यांचा विकास केला. समाजातील सर्व घटकांसाठी मोदींनी काम केले. हाताला काम दिले. रोजगार दिले त्यामुळे देशाच्या विकासाला बळकटी मिळाली. हा फक्त ट्रेलर आहे. पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण पिक्चर दिसेल. मोदींना बळकट करण्यासाठी या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदान करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT