Pune Girl Attack News Sarkarnama
पुणे

Pune Girl Attack : कोयता हल्ल्यात तरुणीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत; "त्या मुलीची जात कुठली?...ते मेसेज डिलिट करा!

सरकारनामा ब्यूरो

Pune Crime News : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी (दि.२७) एक थरारक उडवणारी धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने बाईकवर असणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. मात्र, त्याच वेळी लेशपाल चांगदेव जवळगे या तरुणाने मोठ्या धाडसाने हल्लेखोर विकृत तरुणाला पकडले.

लेशपाल व हर्षद पाटील या तरुणांनी जीवाची बाजी लावून या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावरून या दोघांचेही सर्वत्र कौतुक झाले. अशातच लेशपालने इन्स्टावर एक स्टोरी टाकली. त्यांच्या स्टोरीवरुन आता बरीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्या स्टोरीमध्ये म्हटले आहे ''त्या मुलीची व मुलाची जात कुठली होती असे मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे. की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला'' अशा प्रकारची उद्विग्न पोस्ट लेशपालने इन्स्टावर स्टेटस ठेवली आहे.

Leshpal Instagram post

लेशपाल च्या या स्टेटसमुळे एक चर्चा रंगली आहे. तरुणीसह तिच्यासोबतच्या तरुणावर एका माथेफिरूने कोयत्याने वार करून परिसरात दहशत माजवली. हा थरारक प्रसंग घडत असताना सभोवतालचे लोक बघ्याची भूमिका घेत होते. मात्र, याचवेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या दोन्ही युवकांनी धाडस दाखवले. तसेच त्याला पेरुगेट पोलिसा (Police) च्या स्वाधीन केले. तरुणांच्या या धाडसामुळे एका तरुणीचा जीव वाचला. या त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात दोन्ही तरुणांचा सत्कार करण्यात आला.

काँग्रेस (Congress) भवनात सदाशिव पेठेतील घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल चांगदेव जवळगे आणि हर्षद पाटील या दोन धाडसी युवकांचा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यातील लेशपाल जवळगे हा तरुण राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाला होता. तो राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारत जोडो' यात्रेतून अहिंसेचा केलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे प्रभावित झाल्याचे लेशपालने सांगितले होते.

''राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो' यात्रा काढली. ते पहाटे, उठून सर्वसामान्य जनतेसोबत चालत होते. तसेच या यात्रेत त्यांनी अहिंसेचा पुरस्कार केला. मात्र, सध्या देशात राजकीय नेतेमंडळींकडून धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. मात्र, राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी जेवढी ताकद वापरली गेली, असेल तितकी आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधात वापरली गेली नसेल'' असेही लेशपाल म्हणाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT