पिंपरी : भारताची आर्थिक स्थिती ही अत्यंत बिकट आहे. त्यासाठी केवळ सध्याचे सरकार जबाबदार नसून जागतिकीकरणाचा योग्य पद्धतीने स्वीकार न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले (Achyut Godbole) यांनी पिंपरी-चिंचवमध्ये (Pimpri-Chinchwad) काल व्यक्त केले. त्यांचा रोख हा केंद्रातील सध्याचे भाजप (BJP) सरकार आणि अगोदरच्या कॉंग्रेस Congress) सरकारच्या दिशेने होता. (Achyut Godbole Latest News)
जागतिकीकरणाचे अनेक फायदे झाले. निम्न मध्यमवर्ग मध्यमवर्गात, तर मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गात गेला. मात्र ही प्रगती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, आर्थिक विषमता, बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी निर्माण झाली, प्रगती ठराविक शहरांपर्यंत मर्यादित राहिली. जीडीपी वाढीच्या तुलनेत अपेक्षित रोजगार निर्मिती झाली नाही. त्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. जागतिकीकरणाचे तोटे आणि फायदे दोन्ही झाले, असे गोडबोले म्हणाले. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधांमध्ये अपेक्षित खर्च करून त्या तळातील लोकांपर्यंत पोहचवल्यास आर्थिक स्थिती दीर्घकालीन स्वरुपात सुधारेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या समारोपात गोडबोले बोलत होते. यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, महारष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजन लाखे, उमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी, नागरिक आदी उपस्थित होते. पूर्वेकडील देशांनी शिक्षण, आरोग्य, संशोधन यावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने ते आज चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी भारताला शिक्षण, आरोग्य, संशोधन, पायाभूत सविधा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. त्या सुविधा तळागळातील लोकांपर्यंत पोहचवल्यास भारत नक्कीच चांगल्या स्थितीत येईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक विषमता ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, विषमता असेल, तर आर्थिक संकट येऊ शकते. मात्र, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अपेक्षित खर्च करून सामाजिक पायाभूत सुविधा (social infrastructure) निर्माण केल्यास विषमता कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.