Laxman Hake  Sarkarnama
पुणे

Laxman Hake : 'विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपेल', लक्ष्मण हाकेंना भीती

Roshan More

Laxman Hake News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील शांतता रॅली काढत आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीला महाएल्गार मेळाव्यातून ओबीसी समाजातील नेते उत्तर देत आहेत.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समजामध्ये असुरक्षितता निर्माण केली जाते आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसीचे आरक्षण राहणार नाही, अशी भीती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.

शांतता रॅलीला शाळा कोणत्या अधिकारात बंद ठेवल्या जातात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा सुव्यवस्था ठेऊ शकत नाही का? असा प्रश्न देखील हाके यांनी विचारला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा आमदार पाठींबा देत आहेत. त्यांच्यासाठी कमानी उभारत आहेत. आम्ही मात्र हक्क आणि अधिकारासाठी लढत आहोत. आम्ही कोणाला पाडण्याची भाषा करत नाही. मात्र, ओबीसी आमदारांनी काय केले? याचा विचार नक्कीच ओबीसी समाज विधानसभा निवडणुकीला करेल, असे हाके म्हणाले.

ओबीसी समाजाला फक्त पंचायत राज पंचायती समिती, जिल्हा परिषदमध्ये आरक्षण आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आरक्षण नाही. मात्र, पंचायत राजमध्ये निवडणुका न घेता तेथे प्रशासक कारभार पाहत आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे म्हणत पंचायत राजमधील निवडणुका घेण्याची मागणी हाके यांनी केली.

जरांगे पाटलांवर कोट्यवधी खर्च

ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोट्यवधीची खैरात केली जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदार त्यांचे कमानी लावून स्वागत करत आहेत. आमदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीली सहकार्य करत आहेत तर ओबीसींच्या मेळाव्याला विरोध करत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT