MP Supriya Sule Sarkarnama
पुणे

Walmik Karad Surrender News : 'ती' कोणती मोठी ताकद संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वाचवते आहे? खासदास सुळे म्हणाल्या, 'तर समाधान...'

NCP SharadChandra Pawar Party MP Supriya Sule Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case Walmik Karad Pune CID office : वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मोठी प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Mumbai News : वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर होताच, त्यावरून राजकीय गदारोळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत, हे षडयंत्र कुणाचं आहे? असा मोठा प्रश्न उपस्थित केला.

पोलिसांना दोष देण्याचे टाळत, "या हत्येमागे कोण आहे? हे षडयंत्र कुणाचं आहे? ती कोणती मोठी ताकद संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाचवते आहे? या मुळाशी आपण गेलं पाहिजे”, अशी मागणी खासदार सुळेंनी केली.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी परभणी आणि बीडमधील दोन्ही घटना महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. दोन्ही कुटुंबीयांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. तसेच ती आम्ही पण घेतली पाहिजे. या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानेच शरद पवार यांनी तिथं पहिली धाव घेतली होती आणि त्यानंतर तपासाला वेग आला, असे सांगितले.

वाल्मिक कराड सीआयडीसमोर (CID) सरेंडर झाला यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला शरण वगैरे शब्द योग्य वाटत नाही. अटक झाली असती, तर मनाला थोडंसं समाधान वाटले असते. माझी अपेक्षा होती की, सरकारने त्याला अटक करायला हवी होती. शरण काय म्हणताय? एका माणसाची हत्या झाली आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू आयुष्यात कुणीच विसरणार नाही”.

वाल्मिक कराड याचा शोध पोलिस घेत होते. पण हा माणूस व्हिडिओ व्हायरल करतो. पण तो आपल्याला सापडला नाही. हे फारच धक्कादायक आहे. तसेच ते वेदनादायक देखील आहे. माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांव प्रचंड विश्वास आहे. ज्याच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे रोष व्यक्त होत आहे, तो माणूस व्हिडिओ काढतो. तो पोस्ट करतो आणि तरी त्याला अटक होत नाही. एखाद्या व्यक्तीची हिंमतच कशी होते? यावर गृहमंत्रालयाचं काय निवेदन येतं याची वाट बघूयात. पोलिसांना कसं कळलं नाही की हे कुठे होते? असा प्रश्न देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. ते बीडचे पालकमंत्री झाले किंवा नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते. आमच्या या लेकी-सुनांना न्याय द्या. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू मला प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आपण सगळ्यांनी चर्चा करत महाराष्ट्रातील अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. यात कोणतेही राजकारण नको आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT