Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar : 'मोदी ठरवतात कुठला प्रकल्प कुठे न्यायचा, उरलेल्या राज्यांनी मुजरा घालायचा!'

सरकारनामा ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : महाराष्ट्रातून एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्यावर आता सरकारवर विविध स्तरातून टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर होती. राज्य सरकार गुजरात धार्जिणे असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांनी ही थेट मोदींवर टीका केली आहे.

आंबेडकर म्हणाले, आज एकच देश अस्तित्वात आहे आणि तो म्हणजे केवळ गुजरात. बाकी कुठेच काहीच नाही. पंतप्रधान मोदीच ठरवतात कोणता प्रकल्प कुठे न्यायचा आहे, कोणत्या राज्यात न्यायचा आहे, बाकीच्या उरलेल्या राज्यांनी फक्त मुजरा घालायचे, अशा शब्दात आंबेडकरांनी मोदींवर टीका केली आहे. जो माणूस पत्रकार परिषदेला समोर जात नाही, प्रेसला फेस करू शकत नाही, अशा माणसाकडून काय अपेक्षा आहेत? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल होत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार मुख्यमंत्र्यांना अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT