Ravikant Tupkar  Sarkarnama
पुणे

Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive : 'काहीही झालं तरी बुलडाणा लोकसभा लढणारच'

सरकारनामा ब्यूरो

Buldana Loksabha: आगामी लोकसभा निवडणूका ताकदीने लढवण्याचा निर्णय आमच्या संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आम्ही जिल्ह्यावर जास्त लक्ष दिलं आहे. बुलडाण्यात आम्ही लढणारच आहोत.' असे सांगत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकले आहे. 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत, त्यांनी शेतकरी संघटना, चळवळ, महाराष्ट्राचं राजकारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेंच एकूण राजकारण या संदर्भात सखोल सखोल चर्चाही केली आहे.

गेल्या दोन वर्षात राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर एकाच व्यासपीठावर दिसले नाहीत, या प्रश्नावर बोलताना तुपकर म्हणाले, ''असं काही नाही, पण मी माझ्या जिल्ह्यात जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. आगामी लोकसभा निवडणूका ताकदीने लढवण्याचा निर्णय आमच्या संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आम्ही जिल्ह्यावर जास्त लक्ष दिलं आहे. बुलडाण्यात आम्ही लढणारच आहोत. आम्ही कार्यक्रमाच्या ज्या तारखा ठरवलेल्या असतात, त्या तारखांवर आमचं जाण होतं नाही. त्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ काढू नये.

- तुमच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा आहे. बुलडाणा लोकसभा तुम्ही राष्ट्रवादीकडून लढणार आहात का? या प्रश्नावर बोलताना तुपकर म्हणाले की, 'मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून आलो की लोक म्हणतात मी भाजपमध्ये जाणार, मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून आलो की लोक म्हणतात मी राष्ट्रवादीत जाणार, अशा पद्धतीने आमच्याबाबत संभ्रम तयार केला जात आहे. मी कोणत्या पक्षात जाणार हे अजून काहीही ठरलेलं नाही. तसं काही नसून आम्ही स्वतंत्रपणे लोकसभेची तयारी करत आहोत. आम्ही स्वतंत्रपणेही लोकसभेला लढू शकतो, असं चित्र सध्या बुलड्याण्यात आहेत. या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार, याच्या ऑफर आल्या त्याच्या ऑफर आल्या, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही."

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतकरी संघटना कमकुवत झाली आहे का? यावर, "असं नाही. खरं सांगायचं तर चळवळींचा अभ्यास केला तर या चळवळी कधी पिक अवर ला असतात तर कधी कधी खूप डाऊन होतात. आम्ही जाती-धर्माच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही, आम्ही आर्थिक मुद्द्यावरं लढतो, लोकांच्या पोटापाण्याच्या मुद्द्यावर लढतो. त्यामुळे प्रस्था पितांच्या विरोधात लढताना माणसं दिर्घकाळ टीकून राहतात असं नाही. आम्ही फक्त विदर्भापुरते मर्यादित नाही, पण मराठवाडा आणि खानदेशाचा पट्ट्यात सोयाबीन -कापूस सर्वाधिक प्रमाणात होते. इतके दिवस आम्ही उसाच्या पट्ट्यात अधिक आक्रमक होतो. राजू शेट्टी उसाच्या पट्ट्यासाठी आक्रमक आहेत. पण सोयाबीन कापसासाठीही त्याच पद्धतीने आक्रमक आंदोलने व्हावीत, हा माझ्या सुरुवातीपासून मानस होता." अस उत्तर रविकांत तुपकर यांनी दिलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT