चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील  सरकारनामा
पुणे

सरकार वाचवण्यासाठी राऊतांना कॉंग्रेसबद्दल रोज नव्यानं बरं बोलावं लागतं

सरकारनामा ब्यूरो

सरकारनामा ब्यूरो
पुणे : राज्यातील सरकार कॉंग्रेसच्या टेकूवर असल्याने सरकार वाचविण्यासाठी खासदार संजय राऊत यांना कॉंग्रेसबद्दल रोज नव्यानं बरं बोलावं लागत आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केली.

२०२४ च्या निवडणुकीनंतर कुणा एका पक्षाचे सरकार केंद्रात असणार नाही. या सरकारचे नेतृत्व मोठा पक्ष असल्याने कॉंग्रेसकडेच जाण्याची शक्यता आहे, असे मत दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना खासदार राऊत यांनी व्यक्त केले होते.त्यासंदर्भाने पत्रकारांनी विचारले असता, पाटील यांनी वरील उत्तर दिले.

पाटील म्हणाले, ‘‘ खासदार राऊत यांची अडचण आहे. त्यांना राज्यात सरकार टिकवायचे आहे. क्रॉंग्रेसच्या टेकूशिवाय हे सरकार टिकणे शक्य नाही. त्यामुळे त्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला खूष ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे खासदार राऊत रोज नवं काहीतरी बोलत असावेत.

राज्यात दिवाळी सुरू होत असताना शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सरू आहेत.राज्य सरकारने त्यांना पुरेशी मदत केलेली नाही.विविध विषयावर कुणी कितीही आरोप-प्रत्यारोप करीत असले तरी आमच्यासाठी शेतकऱ्यांची मदत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक हे विषय महत्वाचे आहेत.त्यांचे प्रश्‍न सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करीत राहणार, असे पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT