Pune News : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधूंचे युतीबाबत अद्याप स्पष्टता आली नसल्यामुळे ही युती होणार का? नाही याबाबत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे.
या पार्श्वभूमीवरती पूर्वश्रमीचे मनसेचे नेते आणि सध्या ठाकरेंच्या सेनेत असलेले वसंत मोरे यांनी युतीची शक्यता किती यावर भाष्य केला आहे.
पुण्यामध्ये (Pune) माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, सध्या राज्यामध्ये कोणत्याही निवडणुका नाही. असं असताना देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आणि त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर असं वातावरण तयार झाला आहे की सगळ्याच निवडणुका सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच लोकसभा, विधानसभा निवडणुका (Election) झाल्या आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच राजकारणाचा गाभा असतो आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाल्याने बऱ्याच पक्ष्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. राज्यातील चौका चौकामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहेत. ते जर एकत्र आले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल असं वसंत मोरे म्हणाले.
सध्या मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी एकामेकासमोर आल्यानंतर मन मे लड्डू फुटा अशीच भावना आहे. यापूर्वी देखील ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. मात्र यावेळी दोन्हीकडून एक पाऊल पुढे टाकण्याबाबत भाष्य करण्यात आला आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत सकारात्मक विधान केली आहेत. तरी देखील इतर राजकीय पक्षांनी या मध्ये न पडता दोन्ही ठाकरे बंधू युती बाबतचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत असं वसंत मोरे म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते चिडल्याचं पाहायला मिळालं यावर बोलताना मोरे म्हणाले, ये डर होना जरुरी है प्रत्येकाच्या पोटामध्ये गोळा निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र आले तर चांगल्या चांगल्यांना घाम फुटेल असं मोरे म्हणाले.
ठाकरे बंधूंमध्ये मागे काय झालं हे उगळण्यात अर्थ नाही. कोळसा किती उघडला तरी काळाच असतो. महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. या दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सपोर्ट असून त्याच्या भवितव्यासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं मोरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.