Ad.Dharmendra Khandare
Ad.Dharmendra Khandare Sarkarnama
पुणे

आमदार सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचे काय ?

उमेश घोंगडे

पुणे : सत्ताधारी आमदारांनाच धमकीचे पत्र येत असतील तर सर्व सामान्य नागरीकांनी काय करावे, असा सवाल करत राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दयनीय होत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे यांनी केली आहे.

शिरूरचे उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धाडीवाल तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना धमकीचे पत्र गेल्या काही दिवसापूर्वी आले आहे. काही दिवसांपूर्वी अदित्य चोपडा या नवउद्योजकाचा खून झाल्याची घटना ताजी असताना लोकप्रतिनिधीला धमकी येणे गंभीर असल्याचे खांडरे यांनी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दयनीय झाली आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे व बलात्काराच्या घटना वाढत आहेत.बलात्काराच्या घटनांत तर देशात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे. चुकीचे काम करणाऱ्या लोकांवर पोलीस यंत्रणेचा कसलाही वचक राहिला नसल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे, अशी टीका खांडरे यांनी केली.

शिरूर सारख्या उद्योगस्नेही असलेल्या शहरात आणि मोठे औद्योगिकरण असलेल्या तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी वाढली आहे. खुद्द आमदारांनाच धमकीचा फोन येणे हा या वाढलेल्या गुंडगिरीचाच परिणाम असल्याचे खांडरे यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT