ADV. Asim Sarode
ADV. Asim Sarode Sarkarnama
पुणे

Supreme Court : ...म्हणून सत्तासंघर्षाच्या प्रकरणात उद्धव ठाकरेंची बाजू घेतली; असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितले

सरकारनामा ब्यूरो

Sgivsena News : मागील नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु होती. ती सुनावणी गुरुवारी संपली. अनेक दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. या प्रकरणात काय निकाल येईल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सुनावणीसंदर्भात अॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी आपले मत व्यक्त केले.

ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. या वेळी असीम सरोदे म्हणाले, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहताना आणि सरन्यायाधीशांनी जेव्हा तुषार मेहता यांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा ही केस फक्त राज्यातील सत्तासंघर्षाच्या निगडित राहिली नसून ती भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे ठाकरे या वादामध्ये सरोदे यांनी कायम ठाकरे यांची बाजू घेतली आहे. ठाकरेंची बाजू का घेतली, याचे कारण सरोदे यांना विचारले असता ते म्हणाले, मी कायम कायद्याचा बाजूने असतो. या वेळी कायदा किंवा लोकशाही ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने होती. त्याच्यावर किंवा त्यांच्या पक्षावर अन्याय झाला, असे सरोदे यांनी स्पष्ट केले.

हस्तक्षेप याचिका बोलताना सरोदे म्हणाले की, ''आतापर्यंतच्या भारतीय इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. न्यायालायने ती मान्य केली. हे आमचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने म्हणणे ऐकून घेतले हेही खूप महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा अशा प्रकारच्या सत्तावादात मतदारांची भुमीका न्यायालयाने ऐकून घेतली. मात्र, नंतर न्यायालयाने सांगितले, तुम्ही ज्या बाजूला सपोर्ट करत आहात, त्या बाजूला तुमचे मुद्दे द्या.

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर असिम सरोदे म्हणाले, युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या आहेत. त्यावर चर्चा करत असताना ते म्हणाले की राज्यपालांनी तटस्थ भूमिका घेणे अपेक्षित आहे. मात्र, तसे राज्यपाल वागले नाही. शिंदे जेव्हा बाहेर पडले तेव्हा राज्यपालांनी त्यांना शिवसेना नेते म्हणून शपथ दिली. मात्र, राज्यपालांना पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार नाही.

त्या मुळे अशा परिस्थितीमध्ये पूर्ववत परिस्थिती करण्याचे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. जर न्यायालयाने परिस्थिती पूर्ववत करायचे ठरवले तर उद्धव ठाकरे काही काळासाठी मुख्यमंत्री बनू शकतात. त्यानंतर पुन्हा सभागृहात बहुमत चाचणी होऊ शकते. अशी एक शक्यता असल्याचे असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT