Prasad Lad Sarkarnama
राज्य

भाजपच्या वाट्याला याल, तर तुम्हाला पाय लावून पळावे लागेल

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nites Rane) यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात येत असून राज्य सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) पोलिस यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नितेश राणे हे आज (ता.2 फेब्रुवारी) न्यायालयाचा मान राखण्यासाठी कोर्टाला शरण होत आहे. त्यांना निश्चित जामीन मिळेल, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. तर, विनाकारण भाजपच्या वाट्याला याल, तर जशास तसे उत्तरही मिळेल व तुम्हाला पाय लावून पळावे पण लागेल, असा इशाराही भाजप (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळल्याने राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता राणे स्थानिक न्यायालयात शरण आले असून, त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. (Nitesh Rane bail hearing)

याबाबत बोलतांना प्रसाद लाड म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पोलिस यंत्रणेचा वापर करून राणे पिता-पुत्रांना फसवण्यात येत आहे. मात्र, नितेश राणे हे एक भाजपचे सच्चे कार्यकर्ते असून ते न्यायालयाचा माऩ ठेवण्यासाठी शरण गेले आहेत. त्यांना न्यायालयाकडून नक्की न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर, ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला लाड यांनी इशारा दिला. ते म्हणाले, "विनाकारण भाजपच्या वाट्याला याल, तर जशास तसे उत्तरही मिळेल व तुम्हाला पाय लावून पळावे पण लागेल, हे सर्व विरोधकांनी लक्षात ठेवावे! इथं तुमची दडपशाही किंवा हुकूमशाही चालणार नाही!

दरम्यान, राणे यांच्या जामीन अर्जावर काल न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने अखेर राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आता हा अर्ज उच्च न्यायालयासमोरील निवेदनासह माघारी घेण्यात आला आहे. राणेंना सत्र न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र, राणे हे स्थानिक न्यायालयात शरण गेले आहेत. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना लवकरच अटक होणार आहे.

गेल्या महिनाभरापासून राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT