Supreme Court
Supreme Court Sarkarnama
विशेष

सोमवारी उशिरापर्यंत यादी नसणारे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण असे आले सुनावणीला

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (ता. २३ ऑगस्ट) जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी (ता. २५ ऑगस्ट) घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. पण काल रात्री उशिरापर्यंत हे प्रकरण आज सुनावणीस नव्हते. मात्र, निवडणूक आयोगाने (election commission) कागदपत्रे सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे शिवसेनेकडून (shivsena) करण्यात आलेल्या विनंतीनंतर न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीस घेतले आणि वरील निर्णय घेतला. (Case of power struggle in Maharashtra came to hearing in this manner)

राज्यातील सत्तांतरासंदर्भात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, विधानसभा अध्यक्ष निवड, विधानसभेचे अधिवेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. त्यामुळे सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले हेाते. या संदर्भात काल सुनावणी अपेक्षित होती. मात्र, ती झाली नव्हती. आजच्या सुनावणीसाठी येणाऱ्या यादीत काल रात्री उशिरापर्यंत हे प्रकरण नव्हते. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या या प्रकरणावर सुनावणी होणार का नाही, अशी अनिश्चितता होती.

पक्षचिन्हाबाबत कागदपत्रं सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला आजा अखेरची मुदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयास राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पटलावर घ्यावे, असे विनंती केली. ती विनंती मान्य करत निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली. त्यात राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी (ता. २५ ऑगस्ट) घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. तसेच, शिवसेनेला दिलासा देताना निवडणूक आयोगाने गुरुवारच्या सुनावणीपर्यंत पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये, असे निर्देशही दिले आहेत.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणीची यादी आली. एवढ्या उशिरापर्यंत यादी राहत नाही. मात्र हे दुर्मिळ प्रकार आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा, हिमा कोहिली, कृष्ण मुरारी यांच्यासमोरच झाली. हे प्रकरण काल लिस्ट झाले होते. त्यांनी आज सुनावणी होईल, असे सांगण्यात आले होते. कालच्या लिस्टमध्ये आजच्या सुनावणीसाठी आले नव्हते. मुख्य न्यायमूर्तीना वाटलं असेल की महत्वाचे प्रकरण आहे. येत्या तीन दिवसांत ते रिटायर होणार आहेत. त्यांच्याकडून लोकांनाही निर्णय अपेक्षित होता. पण, वेळेअभावी हे प्रकरण घटनापीठाकडेच वर्ग करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT