Ramdas Athawale
Ramdas Athawale sarkarnama
विशेष

आठवले आल्याशिवाय हा पठ्ठ्या लग्नालाच उभा राहणार नव्हता! मग नेत्यांनीही हट्ट पूर्ण केला...

सरकारनामा ब्यूरो

Ramdas Athawale : बीड : निष्ठावान कार्यकर्त्यांची इच्छा नेत्यांनाही पुरवावी लगाते. त्याचाच प्रत्यय बीडमध्ये आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी थेट दिल्लीवरुन बीडमध्ये (Beed) दाखल झाले.

सर्वसामान्य कुटुंबातील असले तरी गेल्या 40 वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याने त्यांची इच्छा आठवले यांना मोडता आली नाही. बीडच्या कडा गावात साळवे कुटुंबाच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी रामदास आठवले थेट दिल्लीहून दाखल झाले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

बीडच्या आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील अशोक साळवे हे आठवलेंचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांचा मुलगा अविराज यांचा साक्षी हिच्याशी विवाह ठरला होता. मात्र, जोपर्यंत आठवले साहेब लग्नासाठी येणार नाहित तोपर्यंत मुलाचे लग्न करणार नाही. असा जणू काही पवित्रा साळवे यांनी घेतला होता. त्यामुळे वेळातवेळ काढून, अशोक यांच्या इच्छेखातर दिल्लीवरून लग्नासाठी आलो असे, आठवले यांनी सांगितले.

यावेळी रामदास आठवले यांनी नवदांपत्याला आशीर्वाद दिले. दरम्यान, कार्यकर्त्यांचा कट्टरपणा आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आठवले स्वतःहा लग्नासाठी दाखल झाल्याने, या विवाह सोहळ्याची आष्टी परिसरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT