Mood of Maharashtra
Mood of Maharashtra Sarkarnama
विशेष

भाजपचे शंभरपेक्षा जास्त आमदार का निवडून येणार? विश्वंभर चौधरींनी सांगितले कारण...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपची (BJP) स्पेस कुठे असेल तर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांकडून तिकिट न मिळालेले नाराज यांच्यावर त्यांची मोठी भिस्त असेल. दुसरी गोष्टी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु असणाऱ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे, असे विश्लेषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले. (Why more than 100 BJP seats will be elected? dr. Vishwambhar Chaudhary said because...)

महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. त्या कार्यक्रमात डॉ. चौधरी बोलत होते.

डॉ. चौधरी म्हणाले की, राज्यात कॉंग्रेस फॅक्टर म्हणून वाढताना दिसत आहे. सर्व्हेतील आकडेवारी पाहिली की, काही ठिकाणी कमी वाटते आहे. कित्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष आहे. लोकांच्या भावना या वेळी महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

वेगवेगळ्या पक्षांची विचारधारा आणि प्रचार करण्याची पद्धती संपलेली नाही. सध्या राज्यात काय चालू आहे? माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणाचा परिणाम त्या त्या पक्षावर झाला आहे. विचारधारेचा मुद्दा संपला आहे. सेक्युलर मताचा टक्का १ इतका आहे. मोदींच्याबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी जसे आपल्याला सगळे त्रास देतात, असे चित्र निर्माण केले होते, असेही विश्वंभर चौधरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT