Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेना! मोदी-शहांनी सूत्रे घेतली हाती; दोन्ही दावेदार दिल्लीत दाखल

सरकारनामा ब्युरो

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताच्या आकडा गाठला असला तरी आता मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री बिरेनसिंह आणि आणि ज्येष्ठ नेते थोंगाम विश्वजित यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. पुढील 48 तासांत मुख्यमंत्रिपदाची घोषणा भाजपकडून होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बिरेनसिंह आणि विश्वजित यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षा शारदा देवी या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या सिंह आणि विश्वजित हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत. पक्ष नेतृत्वाने त्यांना आजच्या आज दिल्लीत बोलावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

भाजपने मणिपूरसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना निरीक्षक नेमले आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने अखेर केंद्रीय नेतृत्वानेच सूत्रे हाती घेतल्याचे दिसत आहे. मोदी, शहा आणि नड्डा हेच मणिपूरचा पुढचा मुख्यमंत्री ठरवतील, अशी चिन्हे आहेत. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दोन्ही दावेदारांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह (N.Biren Singh) यांनी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. ते काळजीवाहू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. बिरेनसिंह यांनी मणिपूरमध्ये (Manipur Election) पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. याचवेळी असे केल्यास पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना डावलले जाईल, असे पक्षातीलच आणखी एक गट म्हणत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांना मुख्यमंत्रिपदाचा वादावर काहीही स्पष्ट बोलणे टाळून संसदीय मंडळाकडे बोट दाखवले आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. भाजपने हा 32 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 5 तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 7, संयुक्त जनता दल 6 आणि नागा पीपल्स फ्रंट 5 जागांवर विजयी झाले आहेत. यातील नागा पीपल्स फ्रंट आणि संयुक्त जनता दल आता भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस हे दोनच विरोधी पक्ष उरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT