Ajit Pawar  Sarkarnama
विश्लेषण

NCP News: 'त्या' सात आमदारांमुळे अजितदादांच्या स्वप्नाला खीळ; 2 वर्षांपासून केलेले प्रयत्न ठरले व्यर्थ

Major Setback for Ajit Pawar NCP 7 MLAs Resign from Nagaland: नागालँडच्या सात आमदारांनी अजितदादांची साथ सोडल्यामुळे पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले आहेत. राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळण्यास विलंब लागणार, हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. पण निवडणूक आयोगाने दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली, अनेक जण अजित पवार यांच्यासोबत गेले.

त्यानंतर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचा गेलेला राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवून देण्याचा निर्धार केला होता. पण आता त्यांचा हा निर्धार पूर्ण होण्याच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे.

नागालँडच्या सात आमदारांनी अजितदादांची साथ सोडल्यामुळे पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले आहेत. राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळण्यास विलंब लागणार, हे स्पष्ट झाले आहे.

सातही आमदारांनी चार दिवसांपूर्वी सत्ताधारी 'एनडीपीपी' पक्षात प्रवेश केला. यामुळे त्या नागालँडमधील राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नागालँडमधील सातही आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी अजितदादांकडे जाणे पसंद केले होते. पण आता हे सातही आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

त्यांनी सत्ताधारी ‘एनडीपीपी’ पक्षात प्रवेश केला. यामुळे नागालँड विधानसभेत विरोधी पक्षाचं बळ कमी झाले आहे.अजितदादांनी शरद पवार यांनी साथ सोडत २०२३ मध्ये आपल्यासोबत पक्षाचे ४० आमदार घेत महायुतीत सहभागी झाले.

विकासकामासाठी सत्ताधारी विरोधकांना पुरेशा निधी निधी देत नाही, या कारणावरुन अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तशीच परिस्थिती नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांची झाली होती.

सत्तेत नसल्यामुळे विकासकामांना त्यांना पुरेशा निधी मिळत नव्हता, म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्तेत सामील झाले. या 7 आमदाराच्या प्रवेशामुळे सत्ताधारी पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.

प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करावे लागतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आवश्यक असलेली मते मिळवावी लागतात, पक्षाला चार राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा असावा लागतो. तसेच लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा या तीन राज्यामध्ये जिंकणं गरजेचं असतं, आदी निकष पूर्ण केल्यानंतर पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळतो.

नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि आमदार, खासदार वाढविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न व्यर्थ ठरलं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT